पुतीन भारतात असताना आकाशात गोंधळ माजला, हा दुर्दैवी योगायोग नव्हे. तो भारतीय व्यवस्थेच्या नव्या असुरक्षिततेचा इशारा आहे, जिथे राष्ट्राची गती काही खासगी कंपन्यांच्या निर्णयांवर अवलंबून राहू लागली आहे. आज प्रश्न इंडिगोचा आहे. उद्या तो कोणाचाही असू शकतो. त्यामुळे हा केवळ विमानसेवेचा विषय नाही, तर तो लोकशाही, बाजार आणि राष्ट्रसुरक्षेच्या संतुलनाचा प्रश्न आहे.
भारत हा विद्वानांचा देश आणि काशी ही विद्येची नगरी. काशीच्या पवित्र मातीत 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेतील सुमारे दोन हजार मंत्रांचे अत्यंत कठीण दण्डक्रम पारायण महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील 19 वर्षांच्या देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले. वय वर्षे अवघे 19, म्हणजे हल्लीच्या भाषेत ‘जेन झी’चा प्रतिनिधी. एवढ्या लहान वयात अतिशय कठीण असणारे हे पारायण पूर्ण करून त्याने संपूर्ण देशभरातील तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 200 वर्
नक्षलवादी चळवळीत अनेकदा फूट पडली असली तरी कोणत्याही नावाखाली या डाव्या दहशतीने देशाची अनेक राज्ये व्यापली. यावर निर्णायक उपाय योजणे निकडीचे होते. ती इच्छाशक्ती केंद्रातील मोदी सरकारने दाखविली. गेल्या दहा वर्षांतील उचित उपाययोजनांचे अनुकूल परिणाम आता दिसू लागले आहेत. येत्या 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवाद-मुक्त करण्याचा संकल्प केंद्र सरकारने सोडला आहे. त्या संकल्प पूर्तीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. नक्षलवाद-मुक्त देशाची संकल्पपूर्ती नजीक येत असताना या उपायांचा धांडोळा तत्पूर्वीच्या दहा वर्षांच्या
हजारो हजारो हिंदू मंदिरे तोडून आक्रमकांनी एकच सामाजिक वास्तव स्थानिक निवासी हिंदूंवर ठसविण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे,“आम्ही (आक्रमक) तुमच्यापैकी नव्हेत. आम्हाला तुमच्या धर्म आणि संस्कृतीशी काही देणेघेणेच नाही. आम्ही तिचा उच्छेदही करत राहू.” ते एवढेच करून थांबले नाहीत, तर त्यांनी इथे धर्मांतराचे सत्र चालू ठेवत, जोरजबरदस्ती करत स्थानिकांनासुद्धा इथल्या संस्कृती आणि परंपरांपासून तोडले. त्यांनी इथल्या धर्मांतरित समाजाची पाळेमुळे उखडली. त्याचा परिणाम हुमायून कबीरच्या या देश-परंपराविरोधी घोषणेतून समोर येतो आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा ठरलेल्या काणकोण येथील 77 फुटी मूर्तीचे अनावरण केले आणि एक अध्यात्मिक केंद्र बनलेला गोव्यातील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ लोकांच्या चर्चेत आला. मठाचे विद्यमान स्वामीजी प.पू श्रीमद् विद्याधीश तीर्थ यांच्या शुभसंकल्पातून मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही मूर्ती साकारली आहे. भावी काळातील एक आकर्षण आणि धार्मिक पर्यटन केंद्र ठरू पाहणार्या या मठाच्या प्रेरणादायी वाटचालीवर भाष्य करीत या भव्य मूर्ती निर्मितीचा प्रवास कथन
राजकारणात कोणीही कोणाचा दीर्घकाळ शत्रू असत नाही वा मित्रही. इथे कोणाशीही सोयरीक जुळते ती प्रामुख्याने राजकीय लाभाचा विचार करूनच. त्यासाठी पक्ष म्हणून लवचीक भूमिका ठेवावी लागते, त्यापायी अनुयायांचा आणि पारंपरिक मतदारांचा रोषही ओढवून घ्यावा लागतो. हे कटू वाटले तरी वास्तव आहे. मात्र असे करताना जो पक्ष आपल्या मूळ विचारधारेशी-गाभ्याशीच फारकत घेतो तेव्हा तो आपले सत्व आणि स्वत्त्व दोन्ही गमावतो. आणि त्याबरोबर गमावतो, आपल्या कट्टर समर्थकांचा विश्वास.
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
हवाई दलाचा अत्यंत महत्त्वाचा मोहरा म्हणजे एक प्रशिक्षित आणि कुशल वैमानिक. त्याच्या लढाऊ विमानाला जर अपघात झाला किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर त्याला त्याच्या खुर्चीसकट विमानातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अत्यंत कमी वेळात विमानछत तोडावे लागते. संपूर्ण भारतीय बनावटीच्या ’तेजस’ लढाऊ विमानातील या यंत्रणेची माहिती या लेखात सादर केली आहे.
एरवी नोव्हेंबर महिन्यात नागपूरकर थंडीने गारठलेले असतात आणि दिवसभर अंगात लोकरी कपडे असल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. संध्याकाळपासून गारठा सुरू होत असल्याने अनेक जण बाहेर पडण्याचेही टाळतात. पण 22 ते 30 नोव्हेंबर 2025 या 9 दिवसांच्या कालावधीत वातावरणातील गारठा झुगारून नागपुरातील रेशीमबाग मैदानाकडे शेकडो आबालवृद्धांची पावले वळलेली दिसली. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी), महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नागपूर पुस्तक महोत्सव 2025’ नागपूरकरांनी अक्षरशः उचलून धरला. या महोत्सवात
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रू
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ या नवीन शाखेची स्थापना केली. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तसेच इस्रोकडून भविष्यातील चांद्रयान 5 आणि गगनयान मोहिमांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे यापुढे अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतीलच. नक्की या मोहिमा कशा असतील, त्याचबरोबर यापूर्वी ंयशस्वी झालेल्या मोहिमांबद्दल माहिती देणारा लेख...
नाशिकच्या ग्रमाविकासच्या कार्यकर्त्यांनी गारे काकांच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेल्या प्रेरणेने यंदाही वनवासी पाड्यात जाऊन भगिनींबरोबर भाऊबीज आणि स्नेहभोजन करून दिवाळी सण साजरा केला.
पुणे : हिंदू धर्मात ’गोदान’ करण्याचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. सवत्स धेनूचे दान अधिक पुण्यकारक समजले जाते. हिंदुस्थान प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित उपक्रम आपल्या संस्कृतीची सुंदर सामाजिक वीण अधोरेखित करतो. काळाच्या ओघात या संस्काराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि सध्याच्या स्थितीतही दुर्मीळ झालेला ’गोदान’ संस्कार कधीकधी घडतो. हा गोदानाचा संस्कार पुण्याजवळ, हिंगणघाट (उरळीकांचन) ता. हवेली येथे नुकताच पार पडला.
पुण्यमयी गोदावरी माईच्या पवित्र तीरावर जेव्हा सायंकाळच्या पावन आरतीच्या मंगलघंटा निनादू लागतात, तेव्हा निसर्गही थांबून त्या क्षणाचा साक्षीदार होतो. मात्र यंदाच्या आरतीत एक वेगळंच तेज, वेगळीच अनुभूती होती; जेव्हा शीख समुदायाच्या भाविकांच्या भावपूर्ण घोषणा त्या मंत्रगजरात मिसळल्या...
नामकरण हा विधी नवीन बाळाला त्याची ओळख देतो. तसेच बाळाला दिलेले नाव त्याला आपल्या भूमीशी, आकाशाशी, संस्कृतीशी, भाषेशी, देवाशी, धर्माशी आणि भारतीय विज्ञानाशी जोडते. आपल्या नावाविषयी आपल्याला आणि जवळच्यांना आस्था उत्पन्न होते. म्हणून नाव ‘आपले’ असावे.
ससून रूग्णालयात येणार्या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनाही आपल्या मूलभूत गरजांवर खचर्र् करणे क्रमप्राप्त असते. रूग्णांची औषधे आणि आपल्यावर होणार्या खर्चाकडे बघता रूग्ण हेच त्यांच्यासाठी अग्रक्रम असतात. पोटाला चिमटा काढून रूग्णांची सेवा काहीवेळेस करावी लागते. असे चित्र पाहून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट दर्जाचे अन्नदान करावे हे अत्यंत स्तुत्य कार्य सुरेश भिकचंदजी डाकलिया आणि परिवाराच्या हातून घडत आहे.
कोविड आता आपल्यासोबत राहाणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता हा नूतन विषाणू नाही.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
रानभाज्यांपैकी विविध गुणवैशिष्ट्ये जपलेली भाजी म्हणजे करटुली. नांदेड जिल्ह्यातील सुमनबाई बोराळे यांनी यंदाच्या हंगामात अवघ्या दहा गुंठ्यांत नैसर्गिक पद्धतीने करटुले या रानभाजीची यशस्वी पैदास करत लाखोची कमाई केली आहे. आंतरपीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. कमी खर्च व उत्पन्नात वाढ या सूत्राने त्यांनी सर्वांसमोर शेतीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवला आहे.
भात पिकाचे अवशेष आणि त्यापैकी पळींज यामध्ये सर्वांत जास्त सिलिकाचे प्रमाण असते आणि बहुतेक सर्व शेतकरी या पळींजाकडे निरुपयोगी आहे म्हणून दुर्लक्ष करतात आणि टाकून देतात. खरेतर पळींज, भाताचा पेंढा, कोंडा आणि तांदूळ आदी महत्त्वाचे अवशेष आहेत. पिकांची कीड, रोग आणि निसर्गनिर्मित होणार्या प्रतिकूल घटकांशी सामना करण्याची क्षमता या अवशेषात असते.
हरभरा हे रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक. शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड करताना मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात गेल्या काही दशकांपासून मका पिकात वाढ दिसून येत आहे. बदलत्या हवामानात देखील शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी बांधव मका पिकाकडे वळले आहेत. तृणधान्य व चारा याव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात व इथेनॉल निर्मितीत मक्याची मागणी वाढत आहे, याव्यतिरिक्त मानवी आहार व कुक्कुटपालनातील वापरामुळे मक्याला चांगला भाव मिळत आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने त्यांना बर्याच वर्षांच्या संघर्षानंतर स्वत:ची ओळख मिळालीय. खरं तर त्यांची मागच्या दहा वर्षांतील कामगिरी बघितली तर विश्वचषकातील विजय हा कधी ना कधी त्यांच्या पदरात पडलाच असता. पण तो प्रत्यक्ष पडला की, भोवतालची परिस्थिती कशी बदलते याचा अनुभव आता महिला क्रिकेटपटूंना येईल. विराट आणि रोहितसारखे त्यांना लक्षावधी चाहते नसतील. पण, नवीन चाहता वर्ग आणखी वाढेल एवढं नक्की.
जॉर्जियातील बटुमी येथे 5 ते 29 जुलै या दरम्यान फिडे महिला विश्वचषक खेळला गेला. गेल्या 3-4 वर्षांत बुद्धिबळ खेळात भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मात्र त्यात प्रामुख्याने गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन अशा पुरुष खेळाडूंची नावे सातत्याने ऐकायला मिळत होती. पण ह्यावेळी महिलांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आणि एकीकडे तेंडुलकर - अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका उत्कंठावर्धक स्थितीत असतानाही समाजमाध्यमांना आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. महिलांचा हा विश्वचषक भारतीय खेळाडूंनीच गाजवला आणि थेट जेतेपदाला गवसणी घात
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
रवीदादा म्हणजे समरसता चळवळीतील आदर्श व्यक्तीमत्त्व. समरसता चळवळीसाठी आवश्यक कनवाळूपणा, निर्व्याजता, भावुकता हा रवीदादांचा स्थायीभाव होता. रवीदादांनी समरसता हे आपले जीवनमूल्य मानले होते. या मूल्यापासून ते कधीही ढळले नाहीत. ’समरसता‘ हा केवळ भाषण व व्याख्यानाचा नाही तर तो जगण्याचा विषय आहे याची पुरेपूर जाण असलेला हा माणूस समरसता शब्दशः आयुष्यभर जगला होता.
ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेपासून प्रदीर्घ काळ सक्रीय असलेले आदरणीय यशवंतराव लेले यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दु:खद निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. या निमित्ताने कृतीशील ध्येयवाद जगणार्या यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा सविस्तर आढावा घेणारा हा विशेष लेख !
साखर उद्योग व प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगाचा भक्कम पाया उभा करण्यामध्ये वसंतराव देवधरांचा सिंहाचा वाटा आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना कर्ज पुरवठ्याचे एक नवे दालन उपलब्ध करून देणे व त्या माध्यमातून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांची सुद्धा भरभराट होण्यासाठीची संधी निर्माण करण्याचे शिल्पकार म्हणून वसंतराव देवधरांचे नाव अग्रस्थानी राहील यात मुळी शंका नाही. वसंतराव देवधरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
वसंतराव देवधरांचे कार्य प्रेरणास्वरूप असेच होते. समर्पित स्वयंसेवक म्हणून त्यांचा आदर्श आहेच, त्यासोबत त्यांनी अनेक संस्थाना मूर्त रूप दिले आणि त्यांच्या विस्तारासाठी कायम आग्रही व प्रयत्नशील राहिले.
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील प्रथम क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये